Telegram Web Link
_*भारतातील एकमेव न्यायालय जिथे कधी कोणावर अन्याय झाला नाही..!*_

*#दैवत:-छत्रपती शिवाजी महाराज 🙏🏻🚩*
_*एक राजा ज्याने आपल्या प्रजेला समानतेने, सन्मानाने आणि निपक्षपातीपणे वागवावे यात छत्रपती शिवाजी महाराजांशी बरोबरी करणारा राजा या भूतलावर कधी झाला नाही आणि होणार ही नाही. न भूतो न भविष्यती, ऐसे राजा शिवछत्रपती...!*_
_*वडिलांनी दिलेल्या राजमुद्रेतील प्रत्येक शब्द आणि शब्द सत्यात उतरवत जनकल्याणकारी, सार्वभौम, सामर्थ्यशाली, वैभवशाली स्वराज्याची निर्मिती करत आई-वडीलांचे स्वप्न पुर्ण करणारे कर्तव्यनिष्ठ छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.*_

*#शिवराय_असे_शक्तीदाता 🙏🏻🚩*
_*ज्यांच कर्तुत्व सूर्यासारखं तेजस्वी. रयतेवरची माया चंद्रा सारखी शितल आणि ज्यांचा पराक्रम महासागरा येवढा मोठा, अशा जाणत्या राजाचा जन्मोत्सव सोहळा.*_

*#शिवराय_मनामनात_शिवजयंती_घराघरात*🚩

🚩 *#१९ फेब्रुवारी २०२४*
_*आदर्श राज्य म्हणजे समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करणे... या भारतभुमीवरील अठरा पगड जाती आणि बारा बलतेदार यांच्या साथीने या पृथ्वीतलावर हजारो वर्षे प्रत्येक मानवाच्या स्मरणात राहील असा राज्यकारभार प्रस्थापित करणारे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत बहुजनप्रतिपालक श्रीमंतयोगी छञपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त माझ्या राज्याला मानाचा त्रिवार मुजरा...!!*_

*#जय_शिवराय 🚩*
_*माणसाच्या जन्माला येऊन ही दैवत्व कसे प्राप्त होते याचे उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.*_
*@ १९ फेब्रुवारी @*
*छत्रपती शिवाजी महाराज जयंती*

जन्म - १९ फेब्रुवारी १६३० (शिवनेरी,पुणे)
स्मृती - ३ एप्रिल १६८० (रायगड,महाड)

ताठ होतील माना उंच होतील नजरा, या रयतेच्या राजाला 'माझा' मानाचा मुजरा. शिवाजी महाराज आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख 'शिवशंभू' असा होतो. आपल्या असामान्य गुणांमुळे जनमानसांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारा 'जाणता राजा' अर्थात छत्रपती शिवाजी महाराज. एक आदर्श राज्यकर्ता म्हणून त्यांचे नाव अगदी अगत्याने घेतले जाते आणि यापुढेही कायमच घेतले जाईल. आज महाराजांच्या जयंती निमित्ताने महाराजांचे काही गुण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महाराजांचा हा समृद्ध वारसा आपण पुढच्या पीढीपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे. बहुगुणी महाराजांचे असे कोणते गुण आहेत जे पुढच्या पीढीसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील.
*सर्वधर्मसमभाव*
शिवाजी महाराजांच्या स्वधर्माविषयी प्रचंड निष्ठा आणि आदर होता. तरीही देखील त्यांनी कधीही इतर धर्मांचा तिरस्कार किंवा अनादर केला नाही. त्यांच्या सैन्यात हिंदूंप्रमाणे मुस्लिम मावळेही होते. आजच्या काळात लहानपणापासूनच मुलांमध्ये हा गुण रुजवणे, महत्त्वाचे आहे.
*साहसी नि धाडसी वृत्ती*
कोणत्याही संकटात, अडचणीत न डगमगणारे महाराज आणि त्यांच्या साहस कथा ऐकतच आपण लहानाचे मोठे झालोत. कधी शक्ती तर कधी युक्तीच्या जोरावर यशस्वीरित्या साहस कसे करावे, हे महाराजांकडून शिकण्यासारखे आहे.
*कमालीची निष्ठा*
देश, स्वराज्य आणि काम यांच्या प्रती कशी निष्ठा असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महाराज. महाराजांची हीच निष्ठा आज जर आपण आपल्या दैनंदिन कामात आणली तर यशाकडे होणारी आपली वाटचाल कोणीच रोखू शकणार नाही.
*स्त्रियांचा आदर*
आजकाल स्त्रियांवरील वाढते अत्याचार, शोषण हे पाहता आता स्त्री स्वातंत्र्यासोबत स्त्रीयांचा आदर करा हे सांगावे लागत आहे. अशा काळात महाराजांकडून शिकवण नक्कीच पुढील पीढीला देऊ शकतो. 'स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती कुणीही असो' अशी महाराजांची भूमिका होती. महिलांविरुद्ध अत्याचाराला महाराजांनी कधीही थारा दिला नाही.
*नेतृत्व गुण*
शिवाजी महाराजांचा अतिशय महत्त्वाचा गुण म्हणजे नेतृत्व. हातात अधिकार असताना सर्वसमावेषक विचार करणे, इतरांना सोबत घेऊन पुढे जाणे, कुठेही दुजाभाव होऊ न होणे असे आदर्श नेतृत्व पुढच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
*संघ भावना*
महाराजांनी उभं केलेलं 'स्वराज्य' हे सांघिक भावनेचं (टीमवर्कच) बेस्ट उदाहरण आहे. कुठे, कधी कुणाची गरज आहे. कुणाला पुढं करायचं, सोबत घेऊन काम कसं करायचं. आहे त्या टीमच्या साहाय्याने विजयश्री कशी प्राप्त करायची हे महारांजी अनेकवेळा दाखवून दिलंय. कारण सांघिक भावनेमुळेच अनेक कामे सोपी होतात, लवकर होतातन नि आचार विचारांची देवाण घेवाण होते. शिवाजी महाराज यांच्या कार्यास, कोटी कोटी प्रणाम.
_*स्वतः साठी वेळ द्या, कारण आपण आहोत तर जग आहे. आणि अतिशय महत्वाचे, दुसऱ्यासाठी वेळ द्या, कारण ते नसतील तर आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही..*_

*#हर_हर_महादेव 🚩*
*छत्रपति शिवरायांची एवढ़ी माहिती पाठवत आहे की आजच्या काहींना माहिती नाही..*

निदान ही पोस्ट वाचून तरी त्याना माहित होईल.

*☆★स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या थोरांची समाधीस्थळे☆*
_______
*१) लखुजी जाधवराव* (जिजाबार्इंचे वडील)-
सिंदखेड राजा

*२) मालोजीराजे* (शिवरायांचे आजोबा)- इंदापूर, जि. पुणे

*३) विठोजीराजे* (शिवरायांचे चुलते)- भातवडी

*४) शहाजीराजे*- होदिगेरे, ता. कनकगिरी, जि.
दावनगेरे (कर्नाटक)

*५) जिजाबाई -* पाचाड (रायगडाच्या पायथ्याला)

*६) छत्रपती शिवाजी महाराज*- रायगडावर

*७) सईबाई* (शिवरायांच्या पत्नी) - राजगड

*८) पुतळाबाई व सोयराबाई* (शिवरायांच्या पत्नी) - रायगड

*९) संभाजीराजे* (शिवरायांचे थोरले बंधू)
कनकगिरी, ता. गंगावटी, जि. कोप्पल

*१०) छत्रपती संभाजी* (शिवरायांचे थोरले
पुत्र)- वडू कोरेगाव

*११) सखुबाई* (शिवरायांच्या कन्या) माळशिरस, जि. सोलापूर

*१२) सूर्यराव काकडे* (शिवरायांचे जवळचे मित्र)-
साल्हेरच्या किल्ल्याजवळ.

*१३) रामचंद्रपंत अमात्य* (अष्टप्रधान मंडळातील
मंत्री)- पन्हाळगडाच्या पायथ्याशी

*१४) मकूबाई* (शिवरायांच्या भावजयी) - जिती,
ता.
करमाळा, जि. सोलापूर

*१५) शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर-* तामसा, ता. हदगाव, जि. नांदेड
प्रतापराव गुजर - नेसरी, ता. गडहिंग्लज,
जि. कोल्हापूर हंबिरराव मोहिते- तळबीड, ता. कराड

*१६) धनाजी जाधव -* वडगाव (कोल्हापूरजवळ)

*१७) रामाजी पांगेरा -* कन्हेरगड, ता. दिंडोरी,
जि. नाशिक

*१८) बाजी पासळकर आणि गोदाजी जगताप*
(गाधवड, जि. पुणे)

*१९) तानाजी मालुसरे आणि शेलारमामा -*उमरळ

*२०‹) रायबा* (तानाजीचा मुलगा)- पारगड

*२१) बहिर्जी नाईक -* भूपाळगड मौजे बाणूर, ता.
आटपाटी, जि. सांगली

*२२) हिरोजी फर्जंद*आणि शिवरायांचे सावत्र भाऊ -
परळी (रायगडाजवळ)

*२३) शिवा काशिद -* पन्हाळगड

*२४) कान्होजी जेधे आणि जिवा महाल-*
कारी अंकवडे, ता. भोर, जि. पुणे

*२५) मुरारबाजी देशपांडे -*पुरंदर

*२६) संभाजी कावजी -* कोंडावळे, ता.
मुळशी, जि. पुणे

*२७) फिरंगोजी नरसाळा-* संग्रामदुर्ग (चाकण) पुणे

*२८) सिदोजी निंबाळकर -* पट्टागड (संगमनेर)

*२९) बाजी प्रभू व फुलाजी प्रभू*- विशाळगड

*३०) दत्ताजी जाधव* (शिवरायांचे मामा बहादुरजीचे नातू)
निलंगा येथे १६६५ साली. समाधीस्थळ सापडत नाही.

*३१) जानोजी भोसले* नागपूरकर - मु.पो. येडोळा, ता. तुळजापूर

*३२) जानोजी निंबाळकर* (तुळजाभवानी देवीचा दरवाजा यांच्याच
नावाने आहे) - बीड

*३३) जगदेवराव जाधवराव* (जिजाबार्इंचा भाऊ बहादुरजीचा नातू व
देऊळगावराजाचा कर्ता)- ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा, जि.
सोलापूर ३४) नागोजी माने (म्हसवडकर)- सिंदखेडराजा
*३५)हिंमतबहाद्दर उदाजी चव्हाण-* अणदूर, ता. तुळजापूर जि.
उस्मानाबाद ३६) अन्नूबाई
(पहिल्या बाजीरावांच्या बहीण )- मु.पो. तुळजापूर, जि.
उस्मानाबाद

*आज महाराष्ट्रातील ब-याच समाध्या जीर्ण अवस्थेत आहेत.*
काही ठिकाणी समाधी अस्तित्वातच नाहीत आणि ज्या आहेत..
*त्याच्याकडे समाजाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.*

अशी थोरामोठ्यांची समाधीस्थळे पुढील
पिढीला प्रेरणा असतात. *सर्वांत सुंदर समाधीस्थळ शहाजीराजांचे आहे. आपल्यापेक्षा कर्नाटकातील लोकांना हे लवकर समजावे हे विशेष आहे.*

*स्वराज्य*

*छत्रपती शिवाजी राजे भोसले.*
कालखंड :- 1642–1680.
पूर्ण नाव :- शिवाजी शहाजी भोसले.
कुळ :- क्षत्रियकुलावंत, कुल्वादी भूषण
जन्म :- १९ फेब्रुवारी 1630
जन्म ठिकाण :- शिवनेरी गड, पुणे, महाराष्ट्र, भारत.
मृत्यू :- ३ एप्रिल १६८०,मंगळवार.
मृत्यू ठिकाण :- रायगड.

*महाराजांच्या पत्नी-*
१. सई बाई (निंबाळकर)
२. सोयराबाई (मोहिते)
३. पुतळाबाई (पालकर)
४. लक्ष्मीबाई (विचारे)
५. काशीबाई (जाधव)
६. सगुणाबाई (शिर्के)
७. गुनवातीबाई (ईन्गले)
८. सकवारबाई (गायकवाड)

*मुले -*संभाजी, राजाराम,
*मुली -*सखुबाई निंबाळकर, राणूबाई जाधव, अंबिकाबाई महाडिक, दिपाबाई, राजकुंवरबाई शिर्के, कमलबाई पालकर..

*फितुर जन्मले ईथे हि जरी या मातीची खंत आहे..*
*तरी संभाजी राजे अजुन आमच्या छातीत जिवंत आहेत..*

*मुंडके उडवले तरी चालेल पण मान कुणापुढे वाकणार नाहीl*
डोळे काढले तरी चालेल
पण नजर कुणापुढे झुकणार नाही l
*जीभ कापली तरी चालेल पण प्राणाची भिक मागणार नाही l*
हात कापले तरी चालेल
पण हात कुणापुढे जोडणार नाही l
*पाय तोडले तरी चालेल पण आधार कुणाचा घेणार नाही l*

" मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही.
प्राण गेला तरी चालेल,
पण स्वधर्म सोडणार नाही."

ll जय जिजाऊ ll
ll जय शिवराय ll
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*शिवाजी महाराजांचे निधन झाले..*
हि बातमी औरंगजेबाच्या खाजगी सचिवास
समजली. हि बातमी अत्यंत आनंदाची आहे, असे समजून
*सचिव बादशहाच्या वैयक्तिय अभ्यासिकेत सांगण्यासाठी गेला.*
*ही बातमी ऐकून औरंगजेब बादशहाने हातातील कुराण बंद करून बाजूला ठेवले.*
तख्तावरून उठला.
त्याने सचिवास आनंद व्यक्त केल्याबद्दल सजा दिली.
व नमाजाची पोझिशन घेऊन *त्याने दोन्ही हात पसरून आभाळाकडे अल्लाची प्रार्थना करण्यासाठी उंचावले औरंगाजेबाने प्रार्थना केली.*

तिचा *मराठी अनुवाद*-
*"हे देवा माझे साचलेले पुण्य तुझ्या दरबारी आहे.ते खर्ची घालून माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर.*
*आमच्या हिँदूस्थानातील महान मानवतावादी व सर्वधर्म जातीतील स्त्रियांचा रक्षणकर्ता छत्रपती शिवाजी मृत्यू झाला आहे.*
*कृपया त्यांच्या आगमनासाठी तुझ्या स्वर्गाची सताड उघडी ठेव..*

*संदर्भ-* अहेकामे आलमगिरी..
शत्रूंनी सुधा ज्यांचा गुणांचे पोवाडे गायले असे
एकच राजे छत्रपती शिवाजी माझे
छत्रपती शिवाजी महाराज कि जय!!
प्रत्तेकाने सदरची पोस्ट वाचून शेयर करा...हवं
असल्यास " हि आपली जबाबदारी समजा...धर्म समजा...!!"
माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll👏

आपल्याला माहित असणे आवशक आहे..........की ,

आपल्या जिल्ह्यात किती किल्ले आहेत,

महाराष्ट्रातील जिल्हावार किल्ले:

अहमदनगर जिल्हा
1. अहमदनगरचाभुईकोट किल्ला
2. पेडगावचा बहादूरगड
3. रतनगड

औरंगाबाद जिल्हा
1. देवगिरी-दौलताबाद.
कुलाबा जिल्हा (रायगड जिल्हा)
1. अवचितगड
2. उंदेरी
3. कर्नाळा
4. कुलाबा
5. कोथळीगड (पेठचा किल्ला)
6. कोरलई
7. कौला किल्ला॑
8. खांदेरी
9. घोसाळगड
10. चंदेरी
11. तळेगड
12. तुंगी
13. धक
14. पेब
15. प्रबळगड
16. बिरवाडी
17. भिवगड
18. मंगळगड-कांगोरी
19. मलंगगड
20. माणिकगड
21. माणगाव
22. रतनगड
23. रायगड
24. लिंगाणा
25. विशाळगड
26. विश्रामगड
27. सांकशी
28. सागरगड
29. सुरगड
30. सोनगिरी

कोल्हापूर जिल्हा
1. पन्हाळा
2. पावनगड
3. बावडा
4. भूधरगड
5. रांगणा
6. सामानगड

गोंदिया जिल्हा
1. गोंदियाचा प्रतापगड

चंद्रपूर जिल्हा
1. किल्ले चंद्रपूर
2. बल्लारशा

जळगाव जिल्हा
1. अंमळनेरचा किल्ला
2. कन्हेरगड
3. पारोळयाचा किल्ला
4. बहादरपूर किल्ला

ठाणे जिल्हा
1. अर्नाळा
2. अशीरगड
3. असावगड
4. अलिबाग
5. इंद्रगड
6. उंबरगांव
7. कल्याणचा किल्ला
8. कामनदुर्ग
9. काळदुर्ग
10. केळवे-माहीम
11. कोंजकिल्ला
12.गंभीरगड
13. गुमतारा
14. गोरखगड
15. जीवधन
16. टकमक
17. ठाणे किल्ला
18. डहाणू
19. तांदुळवाडी किल्ला
20. तारापूर
21. धारावी
22. दातिवरे
23. दिंडू
24. नळदुर्ग
25. पारसिक
26. बल्लाळगड
27. बळवंतगड
28. बेलापूर
29. भवनगड
30. भैरवगड
31. भोपटगड
32. मानोर
33. माहुली
34. व्ररसोवा
35. वसईचा किल्ला
36. शिरगांवचा किल्ला
37. संजान
38. सिद्धगड
39. सेगवाह

नागपूर जिल्हा
1. आमनेरचा किल्ला
2. उमरेडचा किल्ला
3. गोंड राजाचा किल्ला
4. नगरधन(रामटेक)(भुईकोट
किल्ला)
5. भिवगड
6. सिताबर्डीचा किल्ला

नाशिक जिल्हा
1. अंकाई
2. अचलगड
3. अंजनेरी
4. अलंग
5. अहिवंत
6. इंद्राई
7. कंक्राळा
8. कंचना
9. कन्हेरा
10. कर्हेगड
11. कावनई
12. कुलंग
13. कोळधेर
14. गाळणा
15. घारगड
16. चांदोर
17. जवळ्या
18. टंकाई
19. त्रिंगलवाडी
20. त्रिंबक
21. धैर
22. धोडप
23. पट्टा
24. बहुळा
25. ब्रह्मगिरी
26. भास्करगड
27. मार्किंडा
28. मुल्हेर
29. रवळ्या
30. राजधेर
31. रामसेज
32. वाघेरा
33. वितानगड
34. हर्षगड
35. हातगड

पुणे जिल्हा
1. कुवारी
2. चाकण
3.चावंड
4. जीवधन
5. तिकोना
6. तुंग
7. नारायणगड
8. पुरंदर
9. प्रचंडगड (तोरणा)
10. मल्हारगड
11. राजगड
12. राजमाची
13. विचित्रगड
14. विसापूर
15. लोहगड
16. शिवनेरी
17. सिंहगड
18. हडसर

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हे
1. अंजनवेल
2. आंबोळगड
3. आवर किल्ला
4. कनकदुर्ग
5. कुडाळचा किल्ला
6. कोट कामते
7. खारेपाटण
8. गोवळकोट
9. गोवा
10. जयगड
11. दुर्ग रत्नागिरी
12. देवगड
13. नांदोशी
14. निवती
15.पालगड
16. पूर्णगड
17. प्रचितगड
18. फत्तेगड
19. बाणकोट
20. बांदे
21. भगवंतगड
22. भरतगड
23.भवनगड
24. भैरवगड
25. मंडणगड
26.मनसंतोषगड
27. मनोहरगड
28. महादेवगड
29. महिपतगड
30. यशवंतगड
31. रसाळगड
32. राजापूरचा किल्ला
33. रायगड
34. विजयगड
35. विजयदुर्ग-घेरिय ा
36. वेताळगड
37. सर्जेकोट
38. साठवली
39. सावंतवाडीचा किल्ला
40. सिंधुदुर्ग
41. सुमारगड
42. सुवर्णदुर्ग

सांगली जिल्हा
1. तेरदाळ
2. दोदवाड
3. मंगळवेढे
4. शिरहट्टी
5. श्रीमंतगड
6. सांगली
7. येलवट्टी

सातारा जिल्हा
1. अजिंक्यतारा
2. कमालगड
3. कल्याणगड
4. केंजळगड
5. चंदन
6. जंगली जयगड
7. गुणवंतगड
8. प्रचितगड
9. प्रतापगड
10. पांडवगड
11. बहिरवगड
12. भूषणगड
13. भोपाळगड
14. मकरंदगड
15. मच्छिंद्रगड
16. महिमंडणगड
17. महिमानगड
18. सज्जनगड
19. संतोषगड
20. सदाशिवगड
21. सुंदरगड
22. वर्धनगड
23. वंदनगड
24. वसंतगड
25.वारुगड
26. वैराटगड
🚩🚩जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
_*"गरीब शेतकऱ्यांचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे.”*_

*#छत्रपती_शिवाजी_महाराज*

*#कुळवाडी_भूषण..🙏*
*🚩 #ऊर्जामंत्र*

_*आपल्या इच्छांना मर्यादा द्यायला शिका नाही तर काही दिवसांनी त्या आपलं अस्तित्व संपुष्टात आणतात...!*_

*🚩 #हर_हर_महादेव*
"गरीब शेतकऱ्यांचे नुकसान करून धर्मकार्य करणे हे अधर्मास कारण आहे.”🚩

🙏छत्रपती_शिवाजी_महाराज🚩

कुळवाडी_भूषण..🙏
छत्रपती शिवरायांची अस्सल चित्रे !

शिवाजी महाराजांची अनेक अस्सल चित्रे आज उपलब्ध आहेत, परंतु त्यातील बहुतांश चित्र हि परदेशात आहेत. भारतात उपलब्ध असलेली बहुतांश चित्र हि बरीच अलीकडची आहेत.अनेक चित्रांवर तारीख नसल्याने तत्कालीन कलेक्शन करणार्याने लिहिलेल्या नोट्सवर तारीख अवलंबून आहे किंवा अंदाजावर तारीख मांडता येते. मनुची कलेक्शन ची २चित्र आणि किशनगड चे चित्र सोडता बाकीच्या चित्रांचे चित्रकार उपलब्ध नाहीत.

आजवर उपलब्ध असलेल्या शिवरायांच्या सर्व अस्सल चित्रांचा हा घेतलेला मागोवा -

(डावीकडून उजवीकडे चित्र पहावीत )

1.मनुची चित्र संग्रह - 1672 च्या आसपासचे, मनुचीने भारतातील 56 राजे-बादशाह यांची चित्रे मीर महम्मद कडून तयार केली होती.त्यातील हे चित्र आहे. सध्या हे चित्र पॅरिस मध्ये आहे.

2.किशनगड चित्रशाळा - हे चित्र किशनगड मध्ये तयार केले असून ते 1750 नंतरचे असावे कारण अशी चित्रे तेथील प्रसिद्ध चित्रकार निहाल चंद ने काढली आहेत. हे चित्र सध्या बॉनहॅम्स कलेक्शन लंडन येथे आहे.

3.राजपूत शैली - राजपुती शैलीतील हे चित्र राजस्थान मध्ये काढले गेले असून, 1750 नंतरचे असावे.जगजितसिंह गायकवाड यांचेकडून हे प्राप्त झाले.

4.रॉबर्ट ऑर्म कलेक्शन - हिस्टोरीकल फ्रॅगमेंट्स या ऑर्म च्या पुस्तकात हे चित्र आले आहे, 1782 साली हे पुस्तक आले होते ,हे पेंटिंग 1782 च्या आधीचे आहे.

5.अश्वारूढ शिवराय - 1785, 1821,1831 च्या युनिव्हर्स पिक्चरस्क आणि इंडे या डिडॉट च्या ग्रंथात हि चित्र आले आहे.हे चित्र अँटोन झेनेटी ने काढले आहे. चित्राचा काळ 1705-1741 असावा. झेनेटी ने हे चित्र मनुची साठी काढले असण्याची शक्यता आहे. मूळ चित्र कॉपर एनग्रेव्हड असून त्यावर रंगकाम केले आहे.

6.मुंबईतील चित्र- हे प्रसिद्ध चित्र टाटा कलेक्शन मधील असून 1675 नंतर गोवळकोंडा येथे काढले असावे. छत्रपती शिवाजी वस्तू संग्रहालय,मुंबई येथे चित्र सध्या आहे.

7.फ्रांस राष्ट्रीय ग्रंथालय - वृद्धावस्थेकडे झुकलेले शिवराय हे चित्र 1685 सालचे गोवळकोंडा येथील आहे. सध्या फ्रांस मध्ये आहे.

8.स्मिथ लेसोफ कलेक्शन - छत्रपती शिवरायांचे हे उभे असलेले , एका हातात तलवार , दुसर्या हातात पट्टा असलेले चित्र फ्रांस च्या राष्ट्रीय ग्रंथालयात आहे. हे चित्र १७व्या शतकाच्या शेवटचे असावे.
लेखन - मालोजीराव जगदाळे
शाहजहाँ ने ताजमहल बांधून झाल्यावर आपल्या कारागिरांचे हात कलम केले..
तर
शिवाजीराजाने रायगडावर त्याच्या अभियंत्यांचे नाव कोरून त्यास अजरामर केले...! हाच तो नैतिक फरक
🧡🙌🏻🚩
सबंध मुलुखास स्वाभिमानाने जगायला शिकवणार व्यक्तिमत्त्व, रयतेच मायेचं छत्र "सुवर्णरत्नश्रीपती शिवराय"
शक्तीपीठ
जगद्गुरु संत तुकाराम महाराज व विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज ह्या गुरू- शिष्याची भेट म्हणजे भारतीय इतिहासातील एक सुवर्ण पान ठरतं.

।। भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
2024/09/28 19:25:59
Back to Top
HTML Embed Code: